राहून जे गेले । ते ते सारे हवे
हेच आम्हां ठावे । चिरंतन
नसे ही पोकळी । केवळ मोहाची
थोडीशी द्रोहाची । झाक त्यात
कळेना प्राप्त ते । केव्हा विसरलो
आणि भांबावलो । अजाणता
वाकुल्या दावित । पंचरंगी नाती
येती आणि जाती । निरंतर
अमृताचा वेष । आत विषवल्ली
झाली मात्र हल्ली । प्राणरूप
जीवाभावाच्यांचे । लाभते अस्तित्व
आताशा सदैव । आंतर्जाली
जिण्याची साधने । मौल्यवान दोन
कॉम्प्युटर फोन । हीच आता
तंत्रज्ञानाचेच । गवसेना तंत्र
दोन्ही तंत्र मंत्र । व्यर्थच की
विवेकाची वाट । तंत्रमंत्रापार
जाणीव अपार । हीच अंती
- निलेश पंडित
५ एप्रिल २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा