उद्या पुढ्यात काय पाहणे अशक्य माणसा
अशांत विश्व दग्ध चित्त हाच रोजचा वसा
... तशातही सभोवती असंख्य मोह साचती
पिढीपिढीत चालतो जुनाच गूढ वारसा
नवाच जोम आगळा नवीन लाट आणते
सलील, उष्ण, सज्ज रक्त मोहते, सुखावते
... विरे फिरून लाट मंद मंद होत नेहमी
तरी तसेच फक्त हेच चक्र नित्य चालते
प्रदीर्घ काळ काळही दुरून वाट पाहतो
अखेर एक घाव खोल एकदाच घालतो
... जरी क्षणैक ग्रासते भयाण गूढ वेदना
त्वरेच सर्व संपते तसाच काळ संपतो
प्रवास तोच तोच जो हरेक वेगळा करे
फुले ... तसाच वेगळपणात जीव घाबरे
...गतीविना लयास फक्त जीवमात्र जातसे
भलाबुरा असो गतीज जन्म राहणे बरे
- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा