भिजविता घामात माती
होय अमृत मानवी
शुष्कता वितळून फुटता
कोवळीशी पालवी
सुरकुत्या वा नितळ काया
हे नसे बंधन तिथे
आजही दूषित जगी या
चेतना गवसे जिथे
नग्न सत्याला दडवते
स्वप्न सुंदर रेशमी
आणि वर आयुष्यभर
करते सुखाची बेगमी
कल्पनेची लाभल्याने
जोड जगण्याला अशी
वाट काटेरी क्षणांची
जाचते ना फारशी
- निलेश पंडित
१३ नोव्हेंबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा