हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१२

उतारा


गेले कधी तेजाळुनी जे शांत ता-यांसारखे
मागती ते मते आम्हा आता भिका-यांसारखे

पाहिले मी साप...त्यांचे दात होते काढलेले
लोकहो म्हणता कशाला त्यांना पुढा-यांसारखे?

गोड भाषा, स्वच्छ कपडे...वागण्याला नम्र मूर्ती
लावती ते तात पण नरड्याला शिका-यांसारखे

खाउनी ते पुष्ट असती, कमवुनी संतुष्ट ना पण
मन बघाया जाल तर दिसते आजा-यांसारखे

प्रश्न पडतो मरत नाही देश दंशाने कसा हा?
...मित्रहो जगतो असे हे आपण उता-यांसारखे !

- निलेश पंडित
९ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा