अजूनही आठवतं
शेवरीच्या
मऊसुत … मुलायम
कापसासारख्या
ढगांमध्ये वसलेलं
आपलं
स्वप्नातलं
घरकुल …
त्या घरकुलाभोवती
तरंगणारे स्वप्नांचे ढग …
ते भेदून टाकणाऱ्या
खऱ्याखुऱ्या
दगडी राजवाड्याच्या
उंच मनोऱ्यांच्या
तळाशी वसलेलं
खरंखुरं जग …
जिथे संपली सगळी स्वप्नं
जेव्हा गेलीस तू कायमची
त्या जगात
दिमाखात
जगण्यासाठी
तुझ्याबरोबर घेऊन
साऱ्या आशा
माझ्या मनात शिल्लक ठेवून
एकच मनीषा …
जगण्यात स्वप्नं उरण्यापेक्षा
विरलेल्या स्वप्नांत जगणं बरं
हे तुला न कळो
… कधीही …
- निलेश पंडित
९ एप्रिल २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा