(वृत्त: मालिनी)
"तरतम असण्याची भावना योग्य नाही
सधन गरिब ऐसा ना उरे भेद काही
धडपड करण्याचे सूत्र ध्यानी असावे
उठपळ श्रमण्याला रोज प्राधान्य द्यावे
तगत जगत जावे हीच मात्रा सुखाची
पडत घडत जाणे ह्यात किल्ली यशाची
बहुविध किति सारी संकटे येत जाता
सकस बनत जावी नित्य आयुष्यगाथा"
सहज हसत स्वामी बोध देती जगाला
अगणित मग लाभे देणगी आश्रमाला
अविरत भजणारे सर्व श्रीमंत भक्त
सतत सकल त्यांचा वाढतो भक्तिपंथ
बहुजन श्रमिकांचा वर्ग थोडा निराळा
झिजत पिचत पोसे बुद्धिजीवी जगाला
- निलेश पंडित
३० आॅगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा