हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ९ जुलै, २०१९

हतबुद्ध


राम झाला कृष्ण झाला वर्धमान व बुद्ध झाला
एवढे होऊनही का देश हा हतबुद्ध झाला?

फक्त पापे रोज आयुष्यात केली खूप त्याने
मग गुरूंच्या वरदहस्ताने अचानक शुद्ध झाला

वाढ, समृद्धीच उद्दीष्टे असे जाहीर केले
पक्ष त्यावर जिंकला अन् वाढला, समृद्ध झाला

खाजगी चर्चेत ठरली भाषणांची बारकाई
आणि मग ठरल्याप्रमाणे कंठ त्याचा ऋद्ध झाला

देह देशाच्या अवस्था वेगळ्या हे ज्ञात नव्हते
जन्मत: स्वातंत्र्य मिळता क्षीण झाला वृद्ध झाला


- निलेश पंडित
१० जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा