देशाचा मातीचा । जन्मल्याने राही
असा बंध काही । नाही माझा
मेंदू ह्रदयात । अनाद्यंत भाव
अतूट लगाव । हाच पाया
देशात किरटी । पोरे रडतात
अश्रू सुकतात । गाली माझ्या
उंचावे मानव्य । देश माझा जेव्हा
मान माझी तेव्हा । उंचावते
देश दुबळ्यांच्या । कधी कल्याणार्थ
जोडताच हात । जोडतो मी
मनात मुरती । चवी रुची सूर
भरून ये ऊर । तेव्हा माझा
देशाचे मातीचे । मनात जन्मते
मनात रुजते । बाळकडू
- निलेश पंडित
११ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा