हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

अंत

 

मन घालत बसले रुंजी … असते असेच का हे

रेशमी क्षणांची भुरळ पडावी

लखलखत्या तेजाने आयुष्याच्या जावे मग दिपून कोणी

आणि भ्रमंती संपत यावी!


कोवळेपणाला निबरपणाची झालर जडता

जाते दडून कोमलता सारी

स्मित हास्य मावळे छद्मी घेते जागा त्याची क्रमाक्रमाने

अमृत बनते सुरा विखारी


लागते आस मग खास दिसे जेथे काही ते

मिळवून आपले माझे माझे … 

अन् केवळ माझे … म्हणत मनाशी अट्टाहासाने जपण्याची

लिप्तपणाचे … अवजड ओझे

………..


सुटताच हात एका क्षणात उमटली वेदना

जग धूसरले चेहरा उजळला 

पांगले सर्व थकलेले झाला अंत प्रतिक्षा ज्याची होती

जीव संपला … खर्च संपला!


- निलेश पंडित

९ ॲागस्ट २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा